नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:
एनडीटीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे. एनडीटीव्हीची मालकी आता अदानी समूहाकडे गेल्याने अनेक बदल झाले आहेत. रवीश कुमार हे सध्या एनडीटीव्हीवर ‘प्राइम टाइम’चा कार्यक्रम करत होते. तसेच रवीश की रिपोर्ट, हम लोग, देस की बात हे त्यांचे शोही खूप लोकप्रिय झाले होते. दरम्यान अदानींची एन्ट्री होताच प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनीही राजीनामा दिला. त्यानंतर रविश यांनी सुद्धा आपला राजीनामा दिला आहे.