रावेर ;- तालुक्यातील एका गावात विवाहितेने पतीला मारहाण करीत असल्याने हे भांडण सोडविण्यास गेले असता तिघांनी महिलेच्या पतीला मारहाण करून भांडण सोडविणाऱ्या महिलेची गैरवर्तन केल्यामुळे तिघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर येथील पवन प्रभाकर पाटील सुभाष प्रभाकर पाटील अमोल रमेश पाटील यांनी एका महिलेच्या पतीला चापटा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली . मात्र हे भांडण सुरू असताना त्याची पत्नी ही भांडण सोडवण्यात गेले असता आरोपी एक व दोन यांनी फिर्यादीला लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले त्यामुळे रावेर पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोना अतुल तडवी करीत आहे.