Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»शिवसेनेतील फूट, ठाकरेंचा हट्ट अन्‌ पक्षाचे दोन तुकडे !
    ताज्या बातम्या

    शिवसेनेतील फूट, ठाकरेंचा हट्ट अन्‌ पक्षाचे दोन तुकडे !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 10, 2024No Comments5 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातून दोनवेळा निवडून आलेले शिवसेनेचे राहुल शेवाळे आता तिसऱ्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे जिथे राहुल शेवाळे हे आपल्याच सहकारी अनिल देसाईंविरोधात मैदानात उतरले आहेत. पक्ष फुटीमुळे उद्धव ठाकरे गटाला सहानुभूती मिळू शकते असे मानले जात आहे. शेवाळे यांनी सांगितले की, त्यांनी उद्धव ठाकरेंना समजावण्याचा खूप प्रयत्न केला की त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून स्विकारावे आणि बाळासाबेह ठाकरेंप्रमाणे पक्ष सांभाळावा. पण, त्यांच्या जिद्दीमुळे हे होऊ शकले नाही.

    मुंबईच्या संपूर्ण विकासासाठी डेव्हलपमेंट प्लान पूर्णपणे लागू होणे आवश्यक आहे. पण, केंद्र आणि राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार असल्याने बीएमसी कधी डेव्हलपमेंट प्लान योग्य पद्धतीने लागू करु शकली नाही. मुंबईत डिफेंस, रेल्वेसह केंद्र सरकारची खूप जमीन आहे. भूसंपादन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. डेव्हलपमेंट प्लान लागू करण्यासाठी 14 लाख कोटी रुपयांची गरज आहे. मी पंतप्रधान कार्यलयाला यासंबंधी निवेदन दिले आहे. जेणेकरुन बीएमसी, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मदतीने हा प्लान लागू केला जाऊ शकेल. यामुळे मुंबईकरांना खूप सुविधा मिळतील. आता जेव्हा केंद्रात आणि राज्यात एनडीए आणि महायुतीचे सरकार आहे, तर मुंबईच्या विकासावर जोर देण्यात आला आहे. त्यामुळेच अटल सेतू, कोस्टल रोड आणि मेट्रो प्रकल्पावर अंमलबजावणी होऊ शकली.

    फूट रोखण्यासाठी प्रयत्न

    शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी आणि फूट पडल्यावरही आम्ही उद्धव ठाकरेंना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. शिवसेनेतील फुटीनंतर तब्बल महिनाभर मी उद्धव ठाकरेंना समजावत राहिलो की ते पक्ष फुटण्यापासून वाचवू शकतात. मी त्यांनी सांगितलं की बाळासाहेबांप्रमाणे तुम्ही शिवसेना सांभाळा आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून स्विकारा. पण त्यांच्या हट्टामुळे हे होऊ शकले नाही. जेव्हा उद्धव ठाकरेंनी राज्यात महाविकास आघाडीसोबत युती केली तेव्हा मी सांगितले होते की महाविकास आघाडीसोबत जाऊ नये.

    #shivsena Rahul shewale
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे

    July 20, 2026

    शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या

    July 20, 2026

    शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी

    July 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif