मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:
आपल्या नावापुढे आडनाव न लावण्याचं कारण सांगत पृथ्वीकनं धक्कादायक खुलासा केला आहे.
पृथ्वीकनं आपल्या अभिनयाच्या जोरावर सिने-इंडस्ट्रीत आपलं नाव कामावलं. दरम्यान पृथ्वीक त्याचं आडनाव न लावता पृथ्वीक प्रताप हे नाव लावतो. यावरून त्याला अनेकदा प्रश्न विचारले जातात.
एका मुलाखतीत बोलताना पृथ्वीक म्हणाला, “जेव्हा तुम्ही कुलकर्णी, शिंदे, पाटील असं आडनाव सांगता तेव्हा तुम्हाला लगेच जज केलं जातं. मी लहानपणापासून याचा अनुभव घेतला आहे”. माझं आडनाव कांबळे आहे. मला माझ्या जातीबद्दल कमीपण कधीच वाटत नाही. मी सगळ्यांना आदर करतो. पण आडनाव काढून टाकलं तर त्या व्यक्तीला माणूस म्हणून ट्रीट केलं जातं.
आपल्याकडे आडनाव सांगितलं की लगेच लोक त्याला त्याची जात विचारतात. जातीमुळे माझे 5 ब्रेकअप झाले. आधीच्या तिघींनी मला जातीवरून रिजेक्ट केलं. चौथी माझी गर्लफ्रेंड होती. मी त्यांच्या घरी जायचो. तिचे आई-बाबा आजही माझ्याशी चांगलं वाटतात. माझं काम आवडलं की मला आवर्जून फोन करून सांगतात. आमचं सगळं काही ठीक सुरू होतं. पण तिने एकेदिवशी तिने माझ्या कामावरून आणि पैशांवरून प्रश्न उपस्थित केले. मी त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली.
मला नकार देण्यासाठी ती वेगवेगळी कारण देत होती. पण सगळी कारण मी उधळून लावल्यानंतर तिनं जात मध्ये आणत मला नकार दिला. आधीच्या तिघींनी मला थेट तोंडावर नकार दिला होता पण चौथीने मला थेट नकार न देता गोष्टी फिरवण्याचा प्रयत्न केला. पृथ्वीक पुढे म्हणाला, “मला कोणत्याही जातीबद्दल आक्षेप नाही, कधीच नव्हता. ज्या त्या जातीला सन्माना मिळायला हवा. पण तुम्ही आडनावावरून त्या व्यक्तीची तुलना करता”.
“मी ‘कांबळे’ नसतो ‘कुलकर्णी’ असतो तरीही मी माझं आडनाव लावलं नसतं. मला फक्त माझ्या नावावरून ओळखलं जावं ही माझी इच्च्छा आहे”.