राज्यातंर्गत पीकस्पर्धेत जळगाव जिल्ह्याची आघाडी

0

 

राज्यस्तरावर दोन तर विभागीय स्तरावर पाच शेतकऱ्यांची निवड

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

कृषि विभागामार्फत राज्यातंर्गत पीकस्पर्धा रब्बी हंगाम 2021 मध्ये राबविण्यात आली होती. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांची राज्यस्तरावर तर पाच शेतकऱ्यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहेत. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

या पीक स्पर्धेत राज्यस्तरावर व विभागस्तरावर निवड झालेले जळगाव जिल्ह्यातील शेतकरी याप्रमाणे आहेत.

पिक – रब्बी ज्वारी (सर्वसाधारण गट सन 2021-22) – प्रमोद बापु माळी, मु. पिंपरखेड, ता. भडगांव राज्यस्तर प्रथम क्रमांक, उमेश दिलीप पाटील, मु. वरखेड, ता. भडगांव, राज्यस्तर व्दितीय क्रमांक, रमेश मधुकर पाटील, मु. पो. खर्चाणे, ता. जामनेर, विभागस्तर प्रथम क्रमांक, श्रीमती लताबाई अशोक महाजन, मु. केकतनिंभोरा, ता. जामनेर, विभागस्तर व्दितीय क्रमांक, स्वप्नील दत्तात्रय पाटील, सामरोद, ता. जामनेर, विभागस्तर तृतीय क्रमांक याप्रमाणे निवड झाली आहे.

पिक – हरभरा (सर्वसाधारण गट सन 2021-22) – राकेश वसंत फेगडे, मु. कोरपावली, ता. यावल विभागस्तर तृतीय क्रमांक निवड झाली आहे.

पिक – हरभरा (आदिवासी गट सन 2021-22) – श्रीमती सवित्रीबाई भारसिंग बारेला, गाव वाघझिरा, ता. यावल, विभागस्तर तृतीय क्रमांक निवड झाली आहे.

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून प्रयोग करण्यात येऊन उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्यातील एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा रब्बी हंगाम 2021 मध्ये घेण्यात आली होती. ही स्पर्धा कृषि विभागामार्फत जळगाव जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात आली होती. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.