पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क
बांबरुड (राणीचे) ता. पाचोरा येथे परिसरात दि. १७ रोजी अचानक दुपारी वादळी वारा, विजाचा कडकडाड व गारांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे परिसरात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने त्वरित झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवुन द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे. तसेच वादळी वाऱ्यात गहू, मक्का, सूर्यफूल, दादर हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कापणीला आलेले उभे पीक आडवी पडली तसेच फरदड कपाशी केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अशा अवस्थेत शेतकरी हवालदिल झालेला आहे. तसेच कपाशीला चांगला भाव न मिळाल्याने शेतकरीवर्ग आधीच नाराज झाला आहे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून शासनाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गा कडून होत आहे.