जळगाव;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सामाजिक शास्त्रीय प्रशाळा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
सामाजिकशास्त्र प्रशाळेत प्रभारी संचालक डॉ. अजय पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचे जात- धर्म विहीन समाज व्यवस्था निर्माण करण्याचे स्वप्न आजच्या युवक युवतींनी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. यावेळील प्रमुख पाहुणे म्हणून राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. उमेश गोगडिया यांची उपस्थिती होती. सुकन्या जाधव हिने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे डॉ. विजय घोरपडे तर डॉ अभय मनसरे यांनी आभार मानले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात झालेल्या कार्यक्रमात सहायक अश्विनी पानपाटील यांच्या हस्ते प्रतिमापुजन करण्यात आले. यावेळी संचालक डॉ. अजय सुरवाडे, संदीप भदाणे, प्रा. राकेश गेडाम, भूषण पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.