मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबई महापालिकेतील भ्रष्ट्राचाराविरोधात ठाकरे गट १ जुलै रोजी विराट मोर्चा आयोजित कारणात आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, “दरोडे टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा शोभत नाही. मुंबई महापालिकेच्या कारभाराबाबत कॅगने ताशेरे ओढले आहे. एसआयटीची स्थापना झाल्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.
ठाकरे गटाचा विराट मोर्चा
शिवसेना ठाकरे गट येत्या १ जुलैला मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व शिवसेना नेत्यांसह आदित्य ठाकरे करतील अशी घोषणा माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मुंबई मनपाच्या ठेवी म्हणजेच जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरु आहेत. तोच जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.
काय म्हणाले मुख्यमंत्री
एसआयटी बद्दल विचारल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) म्हणाले “दरोडे टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा शोभत नाही. गेले १५-२० मुंबई महापालिकेवर दरोडा टाकला, मुंबईचे हजारो कोटी कुठे गेले, याचा हिशेब आता कॅग विचारणार आहे. एसआयईटीची स्थापना झाल्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकल्याचे दिसून येत आहे. सर्वांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.