विजेचा धक्का लागल्याने बालिकेचा जागीच मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

देशभरात आनंदमयी वातावरण असतांना जळगाव जिल्ह्यात एका गावात दुर्दैवी घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पिंप्राळा येथे दि. ११ नोव्हेंबररोजी घरी असल्याने घरात पाणी भरण्यासाठी पाण्याची मोटर लावली. व मोटरची पिन काढत असतांना विजेचा धक्का लागल्याने राधिका पुरुषोत्तम कहाते (वय ९) या बालिकेचा मृत्यू झाला.

सविस्तर माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील प्रिंप्राळा येथील पुरुषोत्तम कहाते कुटुंबियांसह हातमजुरीचे काम करतात. दरम्यान ११ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आई, वडील, भाऊ आणि मोठी बहीण मजुरीसाठी शेतात गेल्याने राधिका एकटी घरी होती. नळाला पाणी आल्याने ते भरण्यासाठी राधिका मोटर ची पिन लावण्यासाठी गेली असता, पिन निघून तिच्या अंगावर पडली आणि विजेचा धक्का लागून ती जागेवरच कोसळली. शेजारी रहमारे भागवत पाडेकर यांनी तिच्या अंगावरील पिन काढली. पण राधिकाने जागीच प्राण सोडले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.