“खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी समोर यावे”: मनोज जरांगे

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मराठा आंदोलन दरम्यान प्रथमच मनोज जरांगे पाटील यांनी सरळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे. देवेंद्र फडणवीस कोणाला मोठे होऊ देत नाही. पक्षातील अनेक लोकांना त्यांनी संपवले. महादेव जानकर यांनाही त्यांनी मोठे होऊ दिले नाही. त्यांच्या बामणी कावा माझ्या पुढे चालणार नाही. खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी समोर यावे. कोणाच्या आडून हल्ले करु नये, असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला.

पाच महिने झाले तरी फडणवीस गुन्हे मागे घेत नाही. तुम्हाला बळी पाहिजे तर, मी माझा बळी देण्यास तयार आहे. मी सागर बंगल्यावर येण्यास तयार आहे. यावेळी लोकांनी मनोज जरांगे पाटील यांना शांत होण्याचा सल्ला दिला. त्यानंतरही मनोज जरांगे पाटीलआक्रमक होते. त्यामुळे व्यासपीठावर काही जण आले. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर मनोज जरांगे ऐकवण्यास तयार नव्हते.

मराठ्यांना संपवण्याचा फडणवीस यांचा डाव
देवेंद्र फडणवीस यांचा मला मारण्याचा कट आहे. सलाईनमधून मला विष देण्याचा आहे. यामुळे मी सलाईन घेणेच बंद केले आहे. नारायण राणे आणि अजय बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहे. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मी पायी जाऊन आंदोलन करणार आहे. फडणवीस यांच्यामुळेच सगेसोयऱ्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही. त्यांनी सांगितले तर एका मिनिटांत त्यांची अंमलबजावणी होईल.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.