चक्रीवादळाचा तडाखा ! राज्यात तीन दिवस पावसाचा अर्लट

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

नैऋत्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ (Cyclone) तयार झाल्याने येत्या तीन दिवसात मेघगर्जनेसह मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) वर्तवली आहे. राज्यात मराठवाडा (Marathwada), उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra), पश्चिम महाराष्ट्र (West Maharashtra), कोकण (Konkan) या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात वादळ झाल्याने देशातील काही भागात पाऊस होणार आहे.

राज्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Rain) झालाय. सिंधुदुर्ग, इंदापूर आणि गडचिरोलीसह अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मदौस चक्रीवादळामुळे (Mandous Cyclone) कुडाळ, सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्यातील बहुतांश भागात रिमझिम पाऊस झाला. या पावसामुळे आंबा, काजूला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त आहे.

राज्यातील मराठवाड्यात बीड, उस्मानाबाद, लातूर, पश्चिम महाराष्ट्रात नाशिक तर पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. याशिवाय काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असाही अंदाज हवामान खात्यानं (India Meteorological Department) वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मदौस चक्रीवादळामुळे राज्यात 11 ते 13 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

चक्रीवादळाचा परिणाम हा महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यात 9 ते 16 डिसेंबर दरम्यान ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी अवकाळी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.