भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क
डोक्याला पिस्तूल लावून खंडणीची मागणी करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, दत्त नगर हनुमान मंदीराजवळ जय जाधव (वय-२२) रा. वाल्मिक नगर, जामनेर रोड, भुसावळ हा त्याचे मित्र अमर देविसिंग कसोटे, कुणाला राजू शिंदे, आकाश गणेश फबियानी यांच्यासोबत दत्त नगर येथून जात असतांना त्याठिकाणी निखील राजपूत रा. दत्त नगर, भुसावळ, अक्षय न्हावकर उर्फ थापा, अभिषेक शर्मा आणि पवन चौधरी तिघे रा. श्रीराम नगर, भुसावळ यांनी चौघांना रस्ता अडविला.
यावेळी निखील राजपूत यांने हातात बंदूक घेऊन अमर कसोटे यांच्या डोक्याला लावून खंडणीची मागणी केली. तसेच इतरांनी जय जाधव यांच्या मित्रांना लोखंडी रॉडने मारहाण करून खिश्यातून पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी जय मनोज जाधव याने दिलेल्या फिर्यादीवरून निखील राजपूत रा. दत्त नगर, भुसावळ, अक्षय न्हावकर उर्फ थापा, अभिषेक शर्मा आणि पवन चौधरी तिघे रा. श्रीराम नगर, भुसावळ यांच्या विरोधात भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.