पाकिस्तानला खडे बोल ऐकवून भारतात आल्यावर काय म्हणाले जावेद अख्तर: वाचा सविस्तर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

काही दिवसांपूर्वी जावेद अख्तर पाकिस्तान मध्ये गेले होते. त्यांच्या वक्तव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर अलीकडेच पाकिस्तानातील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी 26/11 हल्ल्याचे सूत्रधार तुमच्या देशात खुलेआम फिरत आहेत, असे वक्तव्य केले होते. मुंबई हल्ल्याबाबत केलेल्या या वक्तव्याला पाकिस्तानातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे जावेद अख्तर यांनी सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे लोकांनी कौतुक केले, असे ते म्हणाले. ‘जेव्हा मी हे बोललो, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सुमारे 3 हजार लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला,’ असे अख्तर यांनी सांगितले.

जावेद अख्तर म्हणाले, ‘पाकिस्तानातील सामान्य लोकांना भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत. पाकिस्तानी लोक पाकिस्तानी सैन्यापेक्षा खूप वेगळे आहेत.’ जावेद अख्तर नुकतेच पाकिस्तानच्या लाहोरमध्ये आयोजित ‘फैज फेस्टिव्हल’मध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी खचाखच भरलेल्या कन्व्हेन्शन हॉलमध्ये दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल पाकिस्तान सरकारवर सडकून टीका केली.

Leave A Reply

Your email address will not be published.