जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
“सर्वसमावेशक पिक विमा योजनेचा” लाभ घेऊन १/- रुपयात विमा काढण्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचे शेतकऱ्यांना आवाहन….
शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत “सर्वसमावेशक पिक विमा योजना” ज्या मध्ये १/- रुपयात शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा काढता येणार असून शेतकऱ्यांची विमा हप्ता रक्कम देखील राज्य सरकार भरणार आहे. या महत्वपूर्ण योजनेच्या माध्यमातून प्रतिकूल हवामान परिस्थिती (Mid Season Adversity), स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात पिकांचे नुकसान व उत्पन्नावर आधारित नुकसान या सर्व बाबी करिता भरपाई मिळणार आहे. सदरिल योजनेच्या प्रचार व प्रसिद्ध जागृती रथाचे शुभारंभ करण्यात आला.
यावेळी शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या सर्व खरीप मधील पिकांचा विमा काढून घेण्याचे आवाहन केले. या प्रसंगी जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, गोपाळ भंगाळे, प्रभाकर सोनवणे, माजी उपमहापौर. अश्र्विन सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मिलिंद चौधरी, नगरसेवक राजेंद्र घुगे, माजी महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महिला आघाडी पदाधिकारी, भाजप पदाधिकारी तथा शेतकरी बांधव उपस्थित होते.