जामनेर तालुक्यात गारपीट, शेत मजुरांची उडाली धांदल

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

यंदा वातावरणात सतत बदल होत असतांना आढळून येत आहे. उन्हाळयात पाऊस होत असून शेतकरी याने त्रस्त आहे. दि.२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यात काही भागात गारांचा पाऊस बरसला यामुळे शेतकऱ्यांसह शेत मजुरांची धांदल उडाली, गुरा-ढोरांना याचा चांगलाच फटका बसला. जामनेर (Jamner) तालुक्यातील हिवरखेडा (तवा) परिसरात आज दुपारी अचानक वातावरणात बदलाव (Climate change) घडून येत गारपीट झाली. हवामान खात्याने अंदाज वर्तविल्या नुसार तीन-चार दिवस धोक्याचे असल्याने सर्वांना सावध केले. त्याचा फटका जिल्ह्यात सर्वप्रथम जामनेर तालुक्याला आज बसला. यामुळे पिकांना चांगलाच फटका बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.