मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई (Mumbai) मध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. १ मे रोजी महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) साजरा केला जातो. अशा स्थितीत त्याच दिवशी मुंबईत दहशतवादी घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गुप्तचर विभागाच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे, तर मुंबई पोलीस विभाग पूर्ण अलर्ट मोडवर आला आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर परेड होणार आहे. हे लक्षात घेऊन दहशतवाद्यांनी हे ठिकाण आणि तारीख निवडली असल्याची शक्यता आहे.
मुंबई पोलीस सतर्क
शिवाजी पार्क परिसरात कलम १४४ लागू करण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्याच्या कटामुळे शिवाजी पार्कचा परिसर नो फ्लाईंग झोन म्हणून घोषित करण्यात आला असून, मुंबई पोलीस विभागाच्या पथकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.