जळगावातील ३३ वर्षीय विवाहितेचा गळफास घेऊन आत्महत्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील एका परिसरातील ३३ वर्षीय विवाहितेचा पती नोकरीच्या ठिकाणी गेलेले होते, तर मुले क्लासला असतांना विवाहितेच्या घरी एकटी असतांना गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना उघडीस आली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. विवाहितेच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून, या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सिद्धिविनायक कॉलनीमध्ये शशिकांत कसोट हे आपल्या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी शशिकांत कसोट हे कामावर गेले होते, तर त्यांचे मुलं ही क्लास गेलेले होत. यावेळी सीमा शशिकांत कसोट (वय ३३) या घरी एकट्याच होत्या. त्यांनी घरात कोणीही नसल्यामुळे ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सायंकाळच्या सुमारास त्यांची मुले क्लासमधून घरी आले तर घराचा दरवाजा आतून लावलेला होता. मुलांनी बराच वेळ आवाज दिला तर प्रतिसाद न मिळालेल्या त्यांनी शेजारी राहणाऱ्यांना सांगितले. त्यांनी दरवाजा उघडताच त्यांना सीमा कसोट या गळफास घेतलेला अवस्थेत दिसून आल्या.

आपल्या आईचा मृतदेह बघताच मुलांचा आक्रोश आपल्या आईचा मृतदेह बघताच कासोट यांच्या मुलांनी एकाच आक्रोश केला. त्यांनी घटनेची माहिती आपल्या वडिलांना दिली. त्यांनी लागलीच घराकडे घाव घेतली. परिसरातील नागरिकांच्या मदतीने तात्काळ जिल्हा शाहसकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी तपासणी करीत मयत घोषित केले. आत्महत्येचे कारण अस्पष्ट सीमा यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली. त्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून, या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ नीलेश पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.