Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कांदा विकल्यानंतर खर्च वजा करता उरले फक्त ४०० रुपये
    • सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात
    • पुन्हा एकदा उष्णता आणि पाऊस असे समीकरण
    • पाकिस्तानमधील बन्नू येथे भीषण प्राणघातक हल्ला
    • होर्मुज खाडीत भारतीय जहाजाला टार्गेट करून हल्ला!
    • ‘खरात’ प्रकरणावरून पुन्हा एकदा उडाली खळबळ
    • मुख्यमंत्री होताच थलपती विजयने घेतले तीन मोठे निर्णय
    • पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसह धोकादायक झाडे, फांद्या हटवा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»सराफ व्यावसायिकांचे हवाल्याचे ७ कोटी रुपये रस्त्यातच लुटले
    उत्तर महाराष्ट्र

    सराफ व्यावसायिकांचे हवाल्याचे ७ कोटी रुपये रस्त्यातच लुटले

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 24, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    १२ दरोडेखोरांना अटक ; पोलीस असून तपासणीचा बहाणा करुन लुटली रोकड

    जळगाव : शहरातील काही बड्या उद्योजकांसह सराफ व्यावसायीकांचे कोट्यावधी रुपये हवाल्यामार्फत मुंबई येथे घेऊन जाण्यासाठी निघाले. परंतु रस्त्यातच शहापूर परिसरात एक वाहनातून सात ते आठ जण येवून त्यांनी ही रोकड लुटल्याची घटना गेल्या आवठड्यात घडली होती. या घटनेमुळे व्यावसायीकांमध्ये मोठी खळबळ माजून गेली आहे. याप्रकरणी काही दिवसांपुर्वी शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी बारा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

    जिल्ह्यातील धरणगाव-मुसळी फाट्याजवळ गेल्या महिन्यात कापूस व्यापाऱ्याचे दीड कोटी रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडली होती. यापुर्वी देखील काही वर्षांपुर्वी रोकड घेऊन जाणाऱ्या कापूस व्यापाऱ्याला लुटणाऱ्यांनी त्याचा निघृण खून केला होता. मात्र व्यापाऱ्याने त्याच्याजवळील पैशांची बॅग न सोडल्यामुळे हल्लेखोरांचा प्रयत्न फसला होता

    मुंबई येथे कमी किंमतीत सोने मिळत असल्याने ते घेण्यासाठी शहरातील पाच ते सहा सराफ व्यावसायीक व उद्योजकांकडील ७ कोटी हवाल्याची रोकड घेवून तो उच्चभ्रू व्यावसायीक दि.१५ रोजी एका बोलेरो वाहनात कुरिअरचे १२ पार्सल घेवून ते मुंबईला जाण्यासाठी निघाले.

    रोकड लुटल्यानंतर काढला पळ शहापूर खर्डी गावालगत गोपाळकृष्णढाब्याच्या पुढे इनोव्हा वाहनात आलेल्या सात ते आठ दरोडेखोरांनी त्यांच्या वाहनाला अडविले. आपण पोलीस असल्याची बतावणी करीत त्यांना काही अंतरावर असलेल्या एका बंद कंपनीच्या मागे दोघांना घेऊन जात वाहनातील गोण्यांमध्ये असलेली रक्कम काढून घेत रिकामे बॉक्स पुन्हा परत वाहनात ठेवून त्यांनी पळ काढला होता.

    १२ दरोडेखोरांना अटक
    शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडेखोरांनी पोलीस असल्याची बतावणी करीत लुटल्यामुळे सराफ व्यावसायीकांमध्ये खळबळ माजून गेली होती. काही दिवसांनंतर शहापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपासचक्रे फिरवित आठ दिवसात बारा दरोडेखोरांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून काही रोकड हस्तगत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

     

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात

    May 10, 2026

    पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसह धोकादायक झाडे, फांद्या हटवा

    May 10, 2026

    ‘कला संस्कार शिबिरा’साठी जळगावचा बालचमू कोल्हापूर रवाना

    May 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif