युवकाचा टोकाचा निर्णय ,गळफास घेऊन संपविले जीवन .. !

0

जळगाव;- एका ४२ वर्षीय युवकाने दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना आज दुपारी सडे तीन वाजेच्या सुमारास मेहरूण परिसरात उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हिरामण मंगल शिंपी (वय-४३, रा. उधना, जि. सुरत ह.मु. जयभवानी नगर, मेहरूण, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि गुजरात येथील उधना येथील रहिवाशी हिरामण मंगल शिंपी हे पत्नी व दोन मुलींसह गेल्या दिड महिन्यांपासून जळगाव शहरातील मेहरूण परिसरात राहणारे शालक पवन मधुकर शिंपी यांच्याकडे वास्तव्याला असून शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी घरातील सर्व सदस्यांना नातेवाईकांकडे जेवणसाठी बोलविण्यात आले होते. दुपारी जेवण झाल्यानंतर हिरामण शिंपी हा घरी आला. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास राहत असलेल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.

आत्महत्या करण्याचे कारण स्पष्ट झालेले नसून हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी आक्रोश केल्यानंतर शेजारी राहणाऱ्या नागरीकांनी तात्काळ घटनास्थळी येऊन हिरामणला खाली उतरवत तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विकास सातदिवे करीत आहे. मयताच्या पश्चात आईवडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.