क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला दोनशेचा टप्पा गाठण्यापासून वंचित ठेवले. आणि संपूर्ण संघाला 191 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला.
नाणेफेक जिंकून भारताचे निमंत्रण मिळाल्यानंतर पाकिस्तानचे सलामीवीर खास इमाम-उल-हक (३६) आणि अब्दुल्ला शफीक (२०) यांनी मिळून संघाला अतिशय आत्मविश्वासपूर्ण सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 41 धावा जोडल्या, मात्र दोन्ही सलामीवीर स्थिरावल्यानंतर बाद झाले. येथून कर्णधार बाबर आझम (50) आणि मोहम्मद रिझवान (49) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 82 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मात्र यानंतर त्यांचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. बुमराह, हार्दिक, कुलदीप, जडेजा, सिराज या पाचही प्रमुख गोलंदाजांनी भेदक मारा करत प्रत्येकी २ बळी घेतले.