स्वप्नरंजन दाखविणारा अर्थसंकल्प – डॉ. उल्हास पाटील

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला आहे. त्यावर कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटलांनी टीकास्त्र सोडले आहे.

केंद्र सरकारप्रमाणे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारनेही समाजातील घटकांसाठी मोठमोठ्या घोषणा करून केवळ स्वप्नरंजन दाखविणारा अर्थसंकल्प सादर केला आहे. जळगाव, धुळे, नंदुरबारसाठी अर्थसंकल्पात ठोस कुठलीही तरतूद करण्यात आली नाही. निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन समाजाला खुश करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात झालेला दिसून येतो. केवळ घोषणांचा पाऊस या अर्थसंकल्पातून पाडण्यात आला आहे. निराशाजनक असा हा अर्थसंकल्प आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.