धरणगाव मातोश्री नगर भागातील नागरी समस्या संदर्भात न.पा. प्रशासनास निवेदन

0

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील मातोश्री नगर परिसरातील नागरिकांनी समस्येचे निवेदन किरण अग्निहोत्री शिवसेना उ बा ठा उपशहर प्रमुख यांचा पुढाकाराने न. पा. प्रशासनास निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदनात मातोश्री नगर येथील रस्त्याची अवस्था अतिशय बिकट असून चालणे सुद्धा मुश्किल आहे, त्यावर सध्या पावसाळ्याचे दिवस असून मुरूम टाकून रस्ता सोयीस्कर करवा, तसेच न पा प्रशासनास आम्ही आरोग्य चा कर भरून सुध्दा गटार साफसफाई होत नसून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे आशा मागणी चे निवेदन न.पा. कार्यालयीन अधीक्षक संजय मिसर यांना देण्यात आले. समस्या चे निराकरण न झाल्यास उपोषणा बसू असा इशारा न. पा. प्रशासनाला देण्यात आला. यावेळी उपस्थित शिवसेना उ.बा.ठा उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री महिला आघाडी चे पदाधिकारी हेमांगी अग्निहोत्री धनराज हरी पाटील बापू महाजन, शिवाजी पाटील, हिम्मतराव भालेराव, देवचंद बत्तीसे, यशवंत तायडे, संदीप पवार, अरुण सोनवणे, नितिन खैरनार, प्रदीप येवले, हिम्मतराव पाटील, पंकज महाजन, गिरिषभाऊ कंखरे, विष्णू काशिनाथ गुजर, संघरत्न नेतकर, प्रशांत सुर्यवंशी, रामराव भदाणे, दीपक पाटील, संजय धामोळे, शंशांक खले, आणि मातोश्रीनगर हमालवाडा कुलटवाडा येथील रहिवासी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.