जळगाव : बिअर घेऊन निघालेल्या तरुणाला रिक्षातून आलेल्या तिघांना वाईन शॉप बंद झाल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्यांनी तरुणावर धारदार शस्त्राने वार करीत तरुणाच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. यामध्ये आकाश प्रकाश तायडे (वय २६, रा. समता नगर) हे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री गिरणा टाकीजवळील वाईन शॉपजवळ घडली. या प्रकरणी तीन अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील समता नगरात आकाश तायडे हा तरुण वास्तव्यास आहे. रविवारी दि. ३१ डिसेंबर रोजी ते रात्री गिरणा टाकी परिसरात असलेल्या वाईन शॉपवर बिअर घेण्यासाठी आले होते. बिअर घेवून जात असतांना ते दुचाकी
बाजूला काढीत होते. त्यावेळी तेथे एक रिक्षा आली आणि त्यातील तिघांनी आकाश तायडे यांना वाईन शॉप चालू आहे का? असे विचारले. त्यावर दुचाकीस्वाराने वाईन शॉप बंद झाले असल्याचे सांगितले.
त्यावरून तिघांनी दुचाकीस्वाराला शिवीगाळ करीत धारदार शस्त्राने हात, मान व कपाळावर वार केला. तसेच काचाची बाटली फोडून डोक्यात मारली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन दुचाकीस्वार जखमी झाले. या प्रकरणी तायडे यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वार करणाऱ्या अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रवीण जगदाळे करीत आहेत.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.