जळगावात धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने एकाचा मृत्यू

0

जळगाव;- धावत्या रेल्वेचा धक्का लागून येथील कांचन नगरातील एका ४५ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत शनीपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अनिल शामराव पाटील (वय-४३) रा. कांचन नगर, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अनिल पाटील हा तरूण आई, वडील, पत्नी व दोन मुलांसह कांचन नगर परिसरात राहत असून पेंटरचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होता. जळगाव ते भादली दरम्यान आलेल्या आसोदा रेल्वे गेटजवळील अप लाईनवरील रेल्वे खंबा क्रमांक ४२०च्या ८ जवळ सोमवारी १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ वाजून ४४ मिनीटांच्या सुमारास अनिल पाटील याचा मृतदेह आढळून आला. कोणत्यातरी धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. मृतदेह हा अनिल पाटील याचा असल्याची ओळख पोलीसांनी पटविली.

पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात वडील शामराव बंडू पाटील, आई इंदूबाई, पत्नी प्रतिभा, भाऊ सुनिल तसचे राणी आणि हर्षल ही दोन मुले असा परिवार आहे. सकाळी ११ वाजता जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.