चाळीसगावच्या कन्नड घाटात भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

कन्नड घाटात रविवारी रात्री १२ वाजता अक्कलकोट येथून देवदर्शन करून परतणाऱ्या जानेवाडी ता. मालेगाव येथील भाविकांच्या खासगी वाहनाला गंभीर अपघात झाला. वाहन हे खोल दरीत कोसळल्याने ४ जण ठार तर ७ जखमी झाले आहेत.

अपघातातून बचावलेल्या मुलाने प्रसंगावधान राखत घटनेची माहिती दिल्यानेच रात्री १ वाजता आमदार मंगेश चव्हाण यांच्या टीमसह महामार्ग, ग्रामीण व शहर पोलिसांसोबत नागरिकांची घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना खोल दरीतून वर काढले. रात्री घाटात प्रचंड धुके होते. पाऊस असल्याने मदत कार्यात अडथळा निर्माण झाला होता.

पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीन ते चार पथके तयार करुन जखमींना मदत केली. अपघातात पत-पत्नीसह लहान मुलीचा मृत्यू झाला आहे.

असा झाला अपघात
जानेवाडी ता.मालेगाव येथील काही भाविक खासगी वाहनाने गाडी क्र. एमएच ४१ व्ही ४८१६ ने अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी गेले होते. ते औरंगाबादहून कन्नडघाटमार्गे चाळीसगावकडे येत असतांना घाटमार्ग संपण्याच्या एक किमी अगोदर हा भीषण अपघात झाला अपघात घडला. गाडीचा चालक अभय पोपटराव जैन (वय ५०) हा काचेवर धुक्यामुळे आलेली वाफ कापडाने पुसत असतांनाच त्याचे गाडीवर नियंत्रण सुटले. यामुळे गाडी थेट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. रविवारी घाटात पाऊस व वादळीवा-यासह धुकेही होते. काही ठिकाणी दरडीही कोसळल्या आहेत. पोलिसांनी घाटात वाहने सावकाश व सावधानतेने चालविण्याचे आवाहन केले आहे.

अपघातील मृत
प्रकाश गुलाबराव शिर्के(वय ६५), शिलाबाई प्रकाश शिर्के (वय ६०), वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी (वय ३५), पूर्वा गणेश देशमुख (वय-८)

अपघातातील जखमी
अनुज धर्मेंद्र सुर्यवंशी (वय २०),जयेश धर्मेंद्र सुर्यवंशी (वय १७), सिध्देश पुरुषोत्तम पवार (वय १२), कृष्णा वासुदेव शिर्के (वय ४), रुपाली गणेश देशमुख (वय ३०), पुष्पा पुरूषोत्तम पवार (वय ३५ )

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.