लोकशाही, न्यूज नेटवर्क
मुंबईत आज मंत्रिमंडळाच्या (Cabinet) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत महत्वपूर्ण निरयन घेण्यात आले. सर्वात महत्वाच म्हणजे अवकाळी पावसाच्या अनुषंगाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. स्वःत मुख्यमंत्र्यांनी याबद्दल ट्विट देखी केले आहे.
मंत्री मंडळाचा निर्णय
आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन आता २५ हजार रुपये करण्यात आलेले असून पूर्वीच्या मानधनात भरीव वाढ केली आहे. कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता विभागासाठी हा निर्णय घेण्यात आला. तसेच अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आलेले आहे. उद्योग विभागांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण, रेडिमेड गारमेंट उद्योग धोरणांना मुदतवाढ देण्यात आली आहे. मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर झाला असून यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले आहेत.