नवी दिल्ली,लोकशाही न्यूज नेटवर्क ;
देश यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. त्यासाठीच केंद्र शासन सतत निरनिराळ्या कार्यक्रमांचे प्रयोजन करत आहे. देशाला स्वतंत्र मिळावे म्हणून अनेक क्रांतिकारकांनी आपले रक्त देशासाठी सांडले तर अनेकांनी प्रबोधनाच्या माध्यमातून देशभक्तीचे बीज पेरले. या क्रांतिकारकांसाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने भारत सरकारने स्तुत्य असा निर्णय घेतला आहे.
स्वातंत्र चळवळीच्या काळात अनेक क्रांतीकारकांनी कविता आणि लेख लिहिले पण, ब्रिटीशांनी त्यावर बंदी आणली होती. या कविता आणि लेख भारत सरकार पुन्हा प्रकाशित करणार आहे. अमृत महोत्सवानिमित्ताने भारत सरकारने एक संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळावर एक वेगळा सेक्शन तयार करण्यात आला आहे. याच सेक्शनमध्ये १९४७ पूर्वी क्रांतीकारकांनी लिहिलेल्या कविता आणि लेख प्रकाशित करण्यात येणार आहे. हे सर्व साहित्य बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, ओडीया, पंजाबी, सिंधी, तामिळ, तेलुगू आणि उर्दू भाषेत प्रकाशित करण्यात येईल.