खळबळजनक; जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यात बॉम्ब असल्याच्या फोनमुळे खळबळ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील नाद या बंगल्यात रात्री बाँम्ब असल्याचा एक अज्ञात फोन काल आला होता. त्यामुळे रात्री खळबळ उडाली. हा फोन आल्यानंतर बॉम्बशोधक विभागाने मध्यरात्री १२ वाजता तपासणी केली. पण, तपासात काहीच सापडले नाही. दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये आव्हाड यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता होती. अश्या प्रकारे त्यांनी ट्विट देखील केलं होतं. या फोनमुळे ठाणे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. या फोननंतर अचानक आव्हाड यांच्या घरी खळबळ उडाली.

यासंबंधी अज्ञातांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा बंगल्यात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा माहिती सापडली नाही. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांना त्रास देणारी नेमकी व्यक्ती कोण याचा पोलीस तपास करत आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी केले ट्विट
दोन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये दिसत असलेला माणूस आणि त्याच्यासोबत असलेला अंकी एक गृहस्थ व्हिडिओ कॉलवर कुणाशी तरी बोलत होते. मला मारण्यासंदर्भात त्यांच्यात चर्चा सुरु होती. ती एका पत्रकाराने ऐकली आणि माझ्यासोबत असणाऱ्या पोलीस व काही मुलांना सांगून सावध केलं. मात्र, तेवढयात तो हातून निसटून हॉटेल ट्रायडंटमध्ये १९ व्या मजल्यावर कुठे तरी गेला. ही बाब नंतर माझ्या कानावर घालण्यात आली. माझ्यासोबत असलेल्या मुलांनी त्याचा पाठलागही करण्याचा प्रयत्न केला. पण, तो त्यांच्या हाती लागला नाही, अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या सोशम मिडीया अकाऊंटवरून सांगितलं होतं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.