भिवंडी येथे भीषण आग, मायलेकाचा होरपळून मृत्यू

0

भिवंडी, लोकशाही न्यूज नेटवर्क

भिवंडीतून दुर्देवी घटना समोर येत आहे. भिंवडी तालुक्यातील गोदामास लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत मायलेकांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील पारसनाथ कंपाऊंड येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. या आगीत २ जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी उशा बनवणाऱ्या शेजाळ इंटरप्रायझेस या कंपनीला (दि.२८) मंगळवार रोजी ६ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागण्याची दुर्घटना घडली. या आगीत काम करणारी महिला व तिच्या सोबत तीन वर्षीय चिमुकल्याचा होरपळून मृत्यू झाला. शकुंतला रवी राजभर (वय ३५) आणि प्रिन्स राजभर (वय ३) असे आगीत होरपळून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

कंपनीत शॉर्ट सर्किटने आग लागल्यानंतर या आगीची माहिती मिळताच कंपनीमध्ये काम करणारे महिला-पुरुष कामगार बाहेर पळाले. त्यानंतर शकुंतला पळाली. परंतु ती बाहेर पडल्यावर तिला तिचा लहान मुलगा आत मध्ये राहिल्याचे लक्षात आले. त्यानंतर शकुंतलादेवी पुन्हा आतमध्ये मुलाला घेण्यासाठी आत गेली पण, परतली नाही.

या अंगाईच्या घटनेनंतर घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या झखल झाल्या. त्या ठिकाणी पाण्याची कमतरता असल्याचे खाजगी ट्रँकरच्या माध्यमातून पाणी पुरविण्यात आले. तर अग्निशामक दलाच्या जवानांनी छतावरील स्लॅब तोडून आग विझविण्याचे प्रयत्न केले.

गोदामाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या बाथरूमजवळ दोघांचे मृतदेह आढळून आले. घटनास्थळी स्थानिक नारपोली पोलीस व तहसीलदार कार्यालयातील अधिकारी दाखल होऊन त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. व शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात रवाना केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.