भरधाव डम्परच्या धडकेत १५ बकऱ्या ठार ; चिंचोलीजवळील घटना

0

जळगाव ,लोकशाही न्युज नेटवर्क
भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने महामार्ग ओलांडणाऱ्या १५ बकऱ्यांना चिरडल्याची घटना जळगाव तालुक्यातील चिंचोली गावाजवळ आज बुधवारी २८ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली . डंपरचालकाला पकडून एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.या अपघातात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

चिंचोली येथील कैलास लटकन कोळी यांच्याकडे २० ते २५ बकऱ्या आहे. बुधवारी २८ मार्च रोजी सकाळी रानात बकऱ्यांना चारून ते दुपारी चिंचोली गावात आले. त्यांच्यासोबत प्रभाकर इखे, गणेश धुमाळ, कैलास पालवे आणि दिदास बागले यांच्या देखील मालकीच्या बकऱ्या सोबत होत्या. कैलास कोळी हे बकऱ्यांना महामार्गावरून ओलांडून नेत असतांना जामनेकर कडून जळगावकडे जाणारा डंपर क्रमांक (एमएच १९ वाय ७७७३) हा सुसाट वेगाने येत असातांना रस्ता ओलांडणाऱ्या बकऱ्यांना चिरडून टाकले. यात एकुण १५ बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनाची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थानी धाव घेतली व डंपरचालकाला ताब्यात घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.