मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे राजीनामा (Resignation) देणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. स्वतः राज्यपालांनी राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उरलेला वेळ चिंतन, मननातं घालविण्याचा मानस पंतप्रधानांना कळविला आहे. अशी माहिती समोर आली आहे. मुंबईत (Mumbai) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) विकासकामांच्या उदघाटनाची आले त्यावेळी मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होईन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करू इच्छितो अशी आशा त्यांच्याकडे व्यक्त केली आहे. या संदर्भात राजभवनाने जारी जेलेल्या प्रसिध्दी पत्रकारून राज्यपाल कोश्यारी यांनीही माहिती दिली.
महाराष्ट्रासारख्या (Maharashtra) संत, समाजसुधारक, आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा मान मिळणे हे माझ्याकरता अहोभाग्य आहे. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात सांगितले आहे.