जळगाव: पिंप्राळा परिसरातील शिवराणा नगरातून १२ वर्षाच्या मुलीसह विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवार ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आला आहे.
जितेंद्र बालू सुतार हे आपल्या पत्नी भारती सुतार (वय ४२) आणि मुलगी केतकी (वय १२ ) यांच्यासोबत पिंप्राळ्यातील शिवराणा नगरात वास्तव्याला आहे. . बुधवार २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता विवाहिता भारती ह्या विवाहिता आपली मुलगी केतकी हिला सोबत घेवून कुणाला काहीही न सांगता रागाच्या भरात घरातून निघून गेल्या.
त्यांचे पती जितेंद्र सुतार यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला परंतू दोघांची माहिती मिळाली नाही. त्यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ निलेश पाटील करीत आहे.