जळगाव:- तालुक्यातील नांद्रा गावातील कॅन्सर रस्त्यावर असणाऱ्या गावठाण जागेतून अज्ञात चोरट्यांनी ६० हजार रुपये किमतीच्या २० बकऱ्या चोरून नेल्याचा प्रकार १०रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी अज्ञात चोट्यांविरुद्ध जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बकरी पालन करणारे नांद्रा बुद्रुक ता. जळगाव येथे राहणारे विजय श्रावण बाविस्कर वय 47 यांच्या गावातील चादसर रस्त्याकडील असलेल्या गावठाण जागेत बांधलेल्या २० हजार रुपये किमतीच्या ५ बकऱ्या ,५ बोकड , तसेच ४० हजार रुपये किमतीच्या आणि १० काळ्या पांढऱ्या व लाल रंगाच्या त्यात ६ बोकड असा एकूण ६० हजार रुपये किमतीच्या बकऱ्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार १० सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आला . याप्रकरणी श्रावण बाविस्कर यांनी तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावर अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ईश्वर लोखंडे करीत आहे.