शिरसोली येथील शेतकऱ्याची आत्महत्या

0

जळगाव : सततच्या नापिकीला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेत ज्ञानेश्वर तुकाराम खलसे (बारी) (वय ५५, रा. बारीनगर, शिरसोली प्रबो, ता. जळगाव) यांनी आत्महत्या केली. ही घटना सोमवार दि. ८ एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

आहे. तालुक्यातील शिरसोली प्र.बो. येथे ज्ञानेश्वर बारी हे वास्तव्यास होते. त्यांचे गावालगतच शेत असून त्यांनी शेतात ज्वारी पेरलेली होती. मात्र यंदा पिकच हाती न आल्यामुळे बारी हे गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होते. याच नैराश्यातून त्यांनी त्यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. त्यांचा पुतण्या श्रीराम खलसे हा शेतात गेला असता, त्याला काका गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्याने घटनेची माहिती लागलीच त्यांच्या कुटुंबियांना दिली. त्यांनी तात्काळ शेतात धाव घेतली.

यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.