शाहजापूर ;– दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी असताना रस्त्याच्या कडेला चुकीच्या बाजूने जाणाऱ्या टँकरच्या समोरासमोर झालेल्या धडकेत गुरुवारी सकाळी ऑटो-रिक्षात प्रवास करणाऱ्या बारा जणांचा मृत्यू झाला,अलाहगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुगसुगी गावाजवळ बरेली-फर्रुखाबाद रस्त्यावर हा भीषण अपघात झाला, असे पोलीस अधीक्षक (एसपी) अशोक कुमार मीना यांनी सांगितले.
टँकरने जलालाबाद बाजूने येणाऱ्या ऑटो रिक्षाला धडक दिली, त्यात सर्व 12 जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांचा समावेश आहे.
एसपी म्हणाले की ते जिल्हा दंडाधिकारी उमेश प्रताप सिंह यांच्यासोबत घटनास्थळी जात होते. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.