मुरबाड, लोकशाही न्यूज नेटवर्क
मुरबाड तालुक्यात भारत बंदसाठी गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी संघटनेचे आंदोलन दिल्लीत चालु असुन भारतीय जनता पक्षाचे सरकार या शेतकरी आंदोलनास काहीच भाव देत नसुन शेतकरी विरोधी कायदा शासनाने केला असुन शेतकऱ्यांच या कायद्याने नुकसान होणार आहे. मात्र केंद्र सरकार या शेतकरी आंदोलन मोडीत काढण्याचा डाव करीत आहे.
मोदी सरकारची ध्येय धोरणे गरीबांना व शेतकरी वर्ग हानिकारक आहेत. पेटोल वाढ डीझेल वाढ, आत्ताच झालेली गैस वाढ, याविरोधात भारत बंद ला मुरबाड मधील श्रमिक मुक्ती संघटना इंदवि तुळतुळे, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष चेतन सिंह पवार, रिपाई सेक्युलरचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप धनगर, प्रहार पक्षाचे तालुकाध्यक्ष एस एल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक वाकचौरे, शिवसेना शहरप्रमुख संतोष जाधव, कार्याध्यक्ष अविनाश भोइर, ठाणे जिल्हा पर्यावरण विभाग अध्यक्ष प्राध्यापक नरेश मोरे व अन्य इतर संघटना व राजकीय पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.