तरवाडे येथील तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

स्वतःच्या शेतातील बोराच्या झाडाला गळफास घेऊन तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथे सकाळी उघडकीस आली. या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मनोज राजेंद्र पाटील (वय-४०) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

मनोज पाटील यांचा शेती व्यवसाय व खासगी नोकरी करत होते. त्यांनी तरवाडे शिवारातील आपल्या शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून पंचनामा केला. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोउपनि कुणाल चव्हाण हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.