एरंडोल जळगाव येथे अजिंठा विश्रामगृहात २७ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता गिरणा प्रकल्पासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. यावेळी रब्बी हंगामासाठी गिरणाच्या आवर्तनाचे नियोजन ठरविण्यात येणार आहे. यावेळी खा. उमेश पाटील, आ. मंगेश पाटील ,आ. चिमणराव पाटील , आ. किशोर पाटील आ. अनिल पाटील यांच्यासह गिरणा लाभक्षेत्रातील सर्व खासदार व आमदार यांची उपस्थिती राहणार आहे.