जळगाव । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यात भाजपला सुरुंग लावण्याची वल्गना केलीय. तर दुसरीकडे त्यांच्या सुनबाई आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांनी ठाकरे सरकार विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत.
येत्या 9 तारखेला खा.रक्षा खडसे ठाकरे सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांकडे राज्य सरकार लक्ष देत नसल्याच्या कारणास्तव रक्षा खडसे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यलयासमोर त्या मोठं आंदोलन करणार आहेत.
भाजपचे सर्व पदाधिकारी आंदोलनात सहभागी होणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी, केळी उत्पादक 2019 या वर्षातील बँकांच्या चुकांमुळे पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत. पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याबाबत कोणत्याही प्रकारची आढावा बैठक घेण्यात आलेली नाही, असा दावा केला जात आहे.
महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे बोलते, परंतु महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अपयशी ठरली, तरी राज्य शासनाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी, या मागणीसाठी जळगाव भाजपतर्फे रक्षा खडसे 9 नोव्हेंबरला आंदोलन करणार आहेत. गेल्या ४ महिन्यांपासून मागणी करुनही राज्य सरकार लक्ष देत नाही. इतर जिल्ह्यातील मंत्री हे त्या ठिकाणी जाऊन पॅकेज घोषित करत आहेत, मग जळगावात का नाही? असा सवाल रक्षा खडसे यांनी उपस्थित केला.
अरे किती मुर्ख समजता जनतेला?