आर्यन खानला वाचवण्यासाठी शिवसेना सर्वोच्च न्यायालयात

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  

आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणाला रोज नवनवीन वळण लागत आहे.  शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला वाचवण्यासाठी शिवसेना नेत्याची सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेना नेते किशोर तिवारी यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आर्यन खान प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची तिवारी यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी केली आहे. एनसीबीकडून काही ठराविक सेलिब्रिटींना टार्गेट केलं जातं असल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे.

तसेच एनसीबी आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात गोवत असल्याचा आरोप देखील शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. ई मेल द्वारे याचिका दाखल केल्याची किशोर तिवारी यांनी माहिती दिली आहे. आर्यन खान सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. त्याच्या वकिलांनी मुंबईच्या सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता, त्यावर सुनावणी झाली आहे. न्यायालयाचा निर्णय 20 ऑक्टोबर रोजी येणार आहे.

आर्यन खानसोबत मुनमुन धमेचा, अरबाज मर्चेंट, नूपुर सारिका, इसमीत सिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा यांना ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे.

राज्य घटनेच्या अनुच्छेद 32 नुसार, याचिका दाखल करत, राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सीजेआय एनव्ही रमण यांच्याशी या प्रकरणाला, ‘प्राधान्य’ देत हस्तक्षेप करण्याचा आग्रह केला आहे. ते म्हणाले, गेल्या जवळपास दोन वर्षांपासून ‘चुकीच्या हेतू’ने एनसीबी पक्षपात करत आहे आणि फिल्म स्टार्स, मॉडेल आणि इतर सेलिब्रिटींना त्रास देत आहे. कलम 32 नुसार, सर्वोच्च न्यायालय आणि CJI मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाशी संबंधित प्रत्येक प्रकरणाची दखल घेण्यास बांधील आहे. जसे की घटनेच्या भाग तीन अंतर्गत हमीदेण्यात आली आहे. ज्याचे NCB उल्लंघन करत आहे.

तिवारी म्हणाले, विशेष एनडीपीएस कोर्टाद्वारे (मुंबई) आर्यन खान आणि इतर आरोपींच्या जामिनावरील निर्णय 20 ऑक्टोबरपर्यंत सार्वजनिक सुट्टीचा हवाला देत टाळणे, म्हणजे आरोपीचा मोठा अपमान आहे. आर्यन खानला 17 रात्र बेकायदेशीरपणे कारागृहात ठेवण्यात आले. हे राज्यघटनेतील जीवन आणि स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.