यावल तालुक्यात कृषी विक्रेत्यांची गुरुवारपासून तीन दिवस दुकाने बंद (पहा व्हिडीओ )

0

यावल तहसीलदार यांना निवेदन सादर

यावल ;– राज्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा मिळण्यासाठी नव्याने आणल्या जात असलेल्या कायद्यांना तीव्र विरोध होत असल्याने कृषी खात्यासमोर पेच तयार झाला आहे. दरम्यान, ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर कृषी विक्री केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय यावल तालुक्यातील कृषी विक्रेत्यांनी घेतला असून त्याबाबत यावल येथील तहसीलदार मोहन माला नाझिरक . व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिले आहे त्यामुळे रब्बी पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांचीही अडचण होणार आहे.

कृषी उत्पादन, विक्री व पुरवठा त्यासंदर्भात तयार करण्यात आलेली विधयके क्रमांक ४०, ४१, ४२, ४३ व ४४ अद्याप मंजूर झालेले नाहीत. या प्रस्तावित पाचही कायद्यांना रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या २, ३ व ४ नोव्हेंबरला राज्यातील सर्व कृषी विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स सीड्स डीलर्स असोसिएशनने (माफदा) घोषित केले आहे. खत नियंत्रण आदेश १९८५, कीटकनाशके कायदा१९६८, तसेच बियाणे कायदा १९६६ यासह इतर तरतुदींचा आधार घेत सध्या निविष्ठा विक्रीतील गैरप्रकारांना रोखण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु या कायद्यांमधील तरतुदी कमकुवत असल्याचे कृषी खात्याचे मत आहे त्यामुळेच नव्या तरतुदींसह सुधारित कायदे आणण्याचा प्रस्ताव राज्य सरकारसमोर मांडला गेला आहे. प्रस्तावित कायद्यात कंपनीसोबत कृषी केंद्रचालकांनाही दोषी ठरवण्याची तरतूद आहे. त्यामुळे महाराष्ट्रा सह यावल तालुक्यात दि . २ . ३ . व ४ नोव्हेंबर रोजी कृषी विकेत्यांची दुकान बंद राहणार असल्याचे अँग्रो डीलर्स असोसिएशनचे यावल तालुका अध्यक्ष मनोज वायकोळे यांनी सांगितले आहे . त्यामुळे ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांची गैरसोय होणार आहे.

माफदा’च्या म्हणण्यानुसार या कायद्यांमध्ये कृषी विक्रेत्यांवर दंड अजामीनपात्र गुन्हा दाखल करणे, मोक्या सारखी कडक कलमे लावणे, कैद करणे अशा तरतुदीदेखील या कायद्यात आहेत. त्यामुळे हे कायदे होऊ न देण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचे कृषी विक्रेत्यांनी निवेदनात म्हटले आहे .या निवेदनावरती यावल तालुक्यातील सर्व कृषी केंद्र चालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी ऍग्रो असोसिएशन दि . २ .३ . व ४ नोव्हेंबर रोजी बंद पुकारला आहे त्यामुळे यावल तालुक्यातील सर्व कृषी दुकाने बंद राहणार आहे तरी शेतकऱ्यांनी शेती उपयोगी बी बियाणे व खते अगोदरच खरेदी करून घ्यावे जेणेकरून शेतकरी यांची गैरसोय होणार नाही .

”मनोज रमेश वायकोळे” , ॲग्रो डीलर्स असोसिएशन यावल तालुका अध्यक्ष

Leave A Reply

Your email address will not be published.