जळगाव -वाघुर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली असून धरण १०० टक्के भरले आहे.
सद्यस्थितीत वाघूर धरणाचे दोन द्वारे १० से.मी.ने उघडण्यात आली आहे व त्याद्वारे ६७७ क्युसेक विसर्ग सोडण्यात आलेला आहे.नदीकाठावरील सर्व लोकांनी सावध राहावे. नदीपात्रामध्ये कोणीही प्रवेश करू नये, शेतीसाठी उपयुक्त सामान ठेवू नये किंवा गुरेढोरे सोडू नये असे आवाहन कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांचे मार्फत करण्यात आले आहे.