विधिमंडळात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्याने आ.अनिल पाटलांचा अमळनेरात सत्कार

0

अधिवेशनातुन परतल्यावर रेल्वे स्थानकावरच घेतली आमदारांची भेट

अमळनेर ,लोकशाही न्यूज नेटवर्क

येथील आमदार अनिल भाईदास पाटील यांनी कांदा व कापूस पिकाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व शेतकऱ्यांच्या मांडण्यासाठी विधिमंडळात केलेले आंदोलन राज्यभर गाजत असताना अधिवेशनाचे पाहिले सेशन आटोपून अमळनेरात परतलेल्या आमदार पाटील यांचा मोठा सत्कार रेल्वे स्थानकावर करण्यात आला.
मतदारसंघातील महाविकास आघाडी घटक पक्षातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते, महिला पदाधिकारी तसेच असंख्य शेतकरी बांधवानी सकाळी 10 वाजता रेल्वे स्टेशन गाठून आमदार अनिल पाटील रेल्वे तुन उतरताच त्यांचा सत्कार केला.शेकडोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती पाहून आमदारही भारावले होते,सदर सत्काराला त्यांनी विरोध केला असता कुणीही एकूण न घेता त्यांच्या गळ्यात पुष्पहारांचा पाऊस पडला.शेतकरी बांधवानी तर याच पद्धतीने शेतकरी बांधवांच्या व्यथा शासन दरबारी मांडणारा लोकप्रतिनिधी आम्हाला हवा असून आज संकटात असलो तरी कुठेतरी आपल्या सारख्या नेत्यांचा आम्हाला धीर असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले.

खरे भूमिपुत्र आमदार-प्रा सुभाष पाटील

काँगेस किसान सभेचे अध्यक्ष प्रा सुभाष पाटील म्हणाले की आमचे खरे भूमिपुत्र आमदार अनिल पाटील यांनी विधिमंडळात सरकारला जागे करून कापसाची दखल घ्यायला भाग पाडले,यामुळे आमच्या आमदारांचा अभिमान आम्हाला असून त्यांनी विधिमंडळात आंदोलन करीत जे कष्ट घेतले त्याबद्दल हा सत्कार आम्ही केला असून असेच शेतकऱ्यांचे विषय ते यापुढेही मांडत राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रत्येक अधिवेशनात अमळनेरचा आवाज-सचिन पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील यांनी प्रत्येक अधिवेशनात आपले भूमीपूत्र आमदार अनिल पाटील यांच्या रूपाने अमळनेर चा आवाज गरजत असून त्यांच्या विविध आंदोलनामुळे सरकारला त्यांची चांगलीच धडकी भरली असल्याची भावना व्यक्त केली.

सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन-आ अनिल पाटील

आमदार अनिल पाटील बोलताना म्हणाले की अधिवेशनात महाविकास आघाडी मधील तिन्ही पक्षाच्या नेत्यांची चर्चा होउन कापूस, कांदा व इतर धान खरेदी याकडे हे सरकार ठरवून लक्ष देत नसल्याने आम्ही सरकारला बोलते करण्याचा प्रयत्न केला,मी स्वतः आपल्याकडे कापसाची जी परिस्थिती झाली आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला,यामुळे सरकार मधील प्रतिनिधी बोलते झाले आता येणाऱ्या काळात कापूस, कांदा, सोयाबीन,धान व सिंचन क्षमता यावरच आम्ही बोलणार असून पाडळसरे धरणाला महाविकास आघाडी सरकारने ज्या पद्धतीने चांगला निधी दिला त्याच पद्धतीने या सरकारने देखील द्यावा अशी मागणी आपण करणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

या प्रसंगी पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच, विकासो चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती, शेतकी संघ आदी सर्व आजी, माजी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.