लखीमपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर बलात्कार केल्यानंतर खून करून मृतदेह झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळले आहेत
परिसरात मोठा तणाव
लखीमपूरी खैरी भागातील निघासन कोतवाली परिसरात दोन अल्पवयीन सख्या बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले आहेत. यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.
#UPDATE | Uttar Pradesh: "Four accused in the matter have been taken into custody. Interrogation is underway," said Additional SP Arun Kumar Singh, Lakhimpur Kheri, after bodies of 2 girls were found hanging from a tree.
(File photo) https://t.co/QoNlxHFwYq pic.twitter.com/BZwMJm6BVE
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 15, 2022
नातेवाईकांनी दिली तक्रार
नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दोन नामांकित आणि तीन अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस भादंविच्या कलम 302, 323, 452 आणि 376 नुसार गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास करत आहेत. दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी दोन्ही अल्पवयीन मुलींना घरातून पळवून नेले, बलात्कार करून त्यांची हत्या करून मृतदेह झाडाला लटकवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
पोलीस स्टेशनला टाळे ठोकले
ही संपूर्ण घटना निघासन कोतवाली परिसरातील तमोलिन पूरवा गावामध्ये घडली आहे. दोन अल्पवयीन सख्या बहिणींचे मृतदेह सापडल्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवत पोलीस स्टेशनला टाळे ठोकले. संतप्त झालेल्या कुटुंबीयांची आणि जमावाची समजूत काढल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी लखीमपूर खेरी येथे पोस्टमॉर्टमला पाठवले. आज (दि.15) सकाळी आठ वाजता तीन डॉक्टर आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोन्ही मुलींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
पोलीस फौजफाटा तैनात
दरम्यान घटनेची माहिती मिळताच लखनऊ रेंजच्या आयजी लक्ष्मी सिंह यांनी घटनास्थळाची पाहणी केली. कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत छोटू नावाचा तरुण आणि गावातील रहिवासी असलेल्या तीन अनोळखी लोकांवर आरोप करण्यात आला आहे. घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केल्याने कोणताही अनुचीत प्रकार घडला नाही.
कोणालाही सोडणार नाही- आयजी
आयजी लक्ष्मी सिंह यांनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बहिणींच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई केली जाईल. दोषींना योग्य ती शिक्षा दिली जाईल गुन्हा सिद्ध होईपर्यंत कोणालाही सोडणार नाही. तसेच फॉरेन्सिक टीम या प्रकरणातील सर्व पैलूंचा तपास करेल. सध्या छोटूसह अन्य तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे गावातील तणाव पाहता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती सिंह यांनी दिली.