खळबळजनक; पत्नी व ३ मुलांची हत्या करून पतीने केली आत्महत्या…

0

 

उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

उत्तर प्रदेशातून एक खळबळजनक घटना समोर येत आहे. जौनपूरच्या मडियाहुन पोलीस स्टेशन हद्दीतील जयरामपूर गावामध्ये ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. जौनपूरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह घरामध्ये आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. पतीने आधी पत्नी आणि तीन मुलांची हत्या केली त्यानंतर त्याने स्वत: गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे उत्तर प्रदेश हादरले आहे. पतीने हे टोकाचे पाऊल का उचलले या मागचे कारण समोर आले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह घरामध्ये आढळून आले. पतीने पत्नीला बेदम मारहाण करत तिची हत्या केली. त्यानंतर त्याने तीन मुलांची गळा दाबून हत्या केल्याचे सांगितले जात आहे. यानंतर या व्यक्तीने स्वतःही आत्महत्या केली. सकाळी घराचा दरवाजा उघडत नसल्यामुळे शेजारी राहणाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी हे धक्कदायक प्रकरण समोर आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.

जयरामपूर गावात राहणारे नागेश विश्वकर्माचे (37) पत्नीसोबत काही कारणावरून भांडण झाले. या वादानंतर त्याने पत्नी राधिकाला बेदम मारहाण केली. आरोपी ऐवढ्यावरच थांबला नाही. त्याने आपल्या तीन निष्पाप मुलांनाही सोडले नाही. पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने मोठी मुलगी निकिता (11), मुलगा आदर्श (8) आणि मुलगी आयुषी (3) यांची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर आरोपीने गळफास लावून आत्महत्या केली.

बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत नागेशच्या घराचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्याच्या शेजारी राहणाऱ्या सोनू विश्वकर्मा या चुलत भावाने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तर पोलिसांना घरातील एकाच बेडवर तीन मुलांचे मृतदेह आढळून आले. पत्नी राधिकाचा मृतदेहही शेजारीच कॉटवर आढळून आला. राधिकाच्या डोक्यावर जखमांच्या खुणा होत्या. तर कपड्याच्या सहाय्याने मुलांचा गळा आवळला होता.

फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. नागेशने पत्नी आणि मुलांची हत्या करुन आत्महत्या का केली या मागचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलीस या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. पाचही जणांचे मृतदेह पोलिसांनी शिवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नागेशने हे टोकाचे पाऊल का उचलले यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या धक्कादायक प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.