जळगाव– स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात ३० मार्च पासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने तर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे, अशी माहिती भाजपा आ.सुरेश भोळे (राजुमामा) यांनी दिली. ही यात्रा ६ एप्रिल पर्यंत चालणार आहे. नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे. असेही ते म्हणाले. यावेळी पत्रकार परिषदेला महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, आदी उपस्थित होते.
आ. राजूमामा भोळे म्हणाले कि , राहुल गांधी व काँग्रेस च्या अन्य नेत्यांकडून सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे. सावरकरांचा अपमान करणान्या काँग्रेसबरोबरची युती उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावीच, असे आव्हानही आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांनी दिले.
राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांतून सावरकर गौरव यात्रा प्रवास करेल. ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी या यात्रेचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपा शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत.
या यात्रेसाठी प्रदेश संयोजक म्हणून प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय तसेच उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, आ.जयकुमार रावल, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे(राजूमामा), दिपक सुर्यवंशी, खा.रक्षाताई खडसे, खा. उन्मेष पाटील, आ. संजय सावकारे, आ. मंगेश चव्हाण, .पी.सी. आबा पाटील, नंदू महाजन, प्रल्हाद पाटील, के.बी.पाटील, राकेश पाटील, सचीन पानपाटील, . हर्षल पाटील, मधुकर काटे,विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, राहुल वाघ, जयेश भावसार, श्रीकांत महाजन, आनंद सपकाळे यांच्या उपस्थितीत होणार आहे.