Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»तीन वर्षापूर्वी केलेला सारंगखेडा तापी नदीवरील पुल खचला; कामाच्या चौकशीची मागणी
    ताज्या बातम्या

    तीन वर्षापूर्वी केलेला सारंगखेडा तापी नदीवरील पुल खचला; कामाच्या चौकशीची मागणी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 18, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क:

     

    सारंगखेडा (ता.शहादा) येथील तापी नदीचा पुलाला काल दुपारी कोसळला. मात्र नागरिकांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला आहे. दुपारी दोन वाजेच्या सुमारास पुलावरून एक मोठे अवजड वाहन जात असताना त्या वाहनाचा टायर पुलावरील एका खड्ड्यात रुतल्यानंतर टाकरखेडा गावाचा दिशेने पुलाला मोठे भगदाड पडले. यावेळी सुदैवाने वाहनाला १६ चाके असल्याने वाहन तिथून निघाले. परंतु ग्रामस्थ व नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासन व इतर विभागाला माहिती कळविली.

    परंतु तब्बल दोन तास होऊनही कोणीही अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी न आल्याने ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने अनर्थ टाळण्यासाठी पुलावरील वाहतूक रोखली. दरम्यान, नदीत अथांग पाणी वाहत आहे. त्यातच पुलावर भगदाड पडले. रविवार हा सारंगखेडा येथील आठवडे बाजार असल्याने टाकरखेडा येथील नागरिक मोठ्या प्रमाणात बाजारासाठी येत असतात. पुलावरून वाहतूक बंद केल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. दरम्यान, काल पुलावर पडलेल्या भगदाडच्या आजूबाजूचा भरावदेखील खचल्याने आज सकाळी पुलाचा आजूबाजूचा दोन्ही टोकापर्यंतचा भाग पूर्णपणे नदीत कोसळला. त्यामुळे संपूर्ण पूल कधी कोसळेल याची शाश्वती नाही. पुलाच्या तीन वर्षापूर्वी केलेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी केली आहे.

    #flood #maharashtra Maharashtra Rain Flood Nandurbar Sarangkheda shahada Tapi River
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!

    August 10, 2026

    फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif