चोपडा – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात काळ्या आईची सेवा करणाऱ्याबद्दल चांगले विचार कधी आले नाहीत. मोदी सरकारने शेतकऱ्यांशी गद्दारी केली. अशी टीका शरद पवार यांनी रावेर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत केली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अरुणभाई गुजराथी, माजी राज्यमंत्री डॉ सतिष पाटील, गुलाबराव देवकर, आ. शिरीष चौधरी, अॅड रविंद्र पाटील, प्रतिभा शिंदे, संदिप पाटील, विष्णू भंगाळे, प्रदिप पवार आदी उपस्थित होते.
गेल्या दहा वर्षांपासून मोदींच्या हातात सत्ता आहे. त्यांनी महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यांनी सांगितले काय आणि केले काय. बेरोजगारी वाढली आहे. देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी असते पण मोदींनी तिचा गैरवापर केला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकले. त्यांच्या दोष काय तर त्यांनी मोदींवर टीका केली म्हणून. सत्ता याच्यासाठी असते काय ? भाषणात मोदी उभे राहिले की राहुल गांधी वर टीका करतात. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, नरसिंहराव यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कामाचा सन्मान झाला पाहिजे पण मोदी त्यांच्यावर टीका करतात असे ही शरद पवार यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मनोगत व्यक्त करीत भाजपावर टीका केली.