समृध्दी महामार्गावर मृत्यूमुखी पडणारा ‘देवेंद्रवासी’ होतो -शरद पवार

0

मुंबई– समृध्दी महामार्गावर झालेल्या अपघातावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टिका केली आहे.

काल मध्यरात्रीच्या सुमारास सिंदखेड राजा शहराजवळ झालेल्या अपघातानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. खासदार संजय राऊत आणि उध्दव ठाकरे यांनी आधीच सरकारवर यावरून टिका केली. यात आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भर पडली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.

या संदर्भात शरद पवार म्हणाले की, समृद्धी महामार्गावर गेल्या काही काळात अपघात झालेत. सातत्याने अपघात होतात आणि हे चित्र काही महिने बघायला मिळतंय. मी त्या रस्त्याने गेलो होतो, त्यावेळी तिथल्या लोकांना त्यांचा अनुभव विचारला. यावर लोकांनी या मार्गावर सातत्याने अपघात पाहिला मिळतात, जो अपघातात मृत्यू पावतो तो ‘देवेंद्रवासी’ होतो, असं लोक सांगतात अशा शब्दात शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टिका केली. तसेच अपघाताचं महत्त्वाचं कारण रस्त्याचं काम शास्त्रीय पद्धतीने झालेलं नसावं, ज्यांनी रस्त्यांचं नियोजन केलं, ते लोक दोषी ठरवतात असं शरद पवार यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.