दुर्देवी घटना.. विजेच्या धक्याने बालकाचा मृत्यू

0

सावदा, ता. रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  

खिरोदा येथे वादळी वार्‍यामुळे तुटून पडलेल्या विजेच्या तारांचा धक्का लागल्याने एका बालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

काल सायंकाळी  रावेर तालुक्यातील बर्‍याच परिसराला वादळी वार्‍याने जोरदार तडाखा दिला. यामुले खिरोदा तसेच परिसरातील गावांना मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी पत्रे उडाली. तसेच तारा देखील खाली पडल्या. यामुळे या भागातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

तर आज सकाळी खिरोदा येथील बाहेरपुरा भागातील रहिवासी असणार्‍या अफसर अजित तडवी या पाच वर्षाच्या बालकाचा विजेच्या धक्क्याने अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. काल वादळात पडलेल्या तारांना त्याचा स्पर्श झाल्याने या चिमुकल्याला प्राण गमवावा लागल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.

याप्रकरणी सावदा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.